जळगाव,(प्रतिनिधी)- राजपूत समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासूनगिरीशसिंह परदेशी व रोशनसिंह राजपूत यांनी आमरण उपोषण पुकारण्यात आले असून त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठींबा मिळत आहे.राजपूत समाजाला देण्यात आलेल्या आश्वासनाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील हे सरकार केवळ आश्वासने देत असून त्यावर कुठलीही अंमलबजावणी करीत नाहीये,राज्य सरकारने त्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्वरीत मागण्या मान्य कराव्या असा इशाराही प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.डॉ. उल्हास पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपूत समाजाच्या मागण्या मान्य करीत भामटा शब्द काढण्याचे आश्वासन दिले होते त्यासह इतर मागण्याबाबत शासनाने अंमलबजावणी करावी याकरिता आमरण उपोषण सुरु आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांनी आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी राजपूत समाजाच्या आंदोलनाला प्रदेश काँग्रेसचा पाठींबा असल्याचे जाहीर करत राज्य सरकारने राजपूत समाजाच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्या, राजपूत समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका असा गर्भित इशारा दिला.
राजपूत समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाचे गिरीशसिंह परदेशी व रोशनसिंह राजपूत यांच्यासह समाजबांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण पुकारले आहे. आंदोलनस्थळी माजी खासदार डॉ उल्हास पाटलांनी भेट दिली.