अहमदनगर,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिर्डी येथे कौटुंबिक वादातून जावयाने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने बुधवारी रात्री सासरच्या कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.
अवघ्या पाच – दहा मिनिटांत जावयाने सासरच्या घरात हाणामारी केली आणि कुटुंबातील सहा जणांवर हल्ला करून तीन जणांना जीवे ठार मारले व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने शिर्डीत घबराट पसरली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्डीजवळील सावळी विहीर गावात ही हृदयद्रावक घटना घडली. संगमनेर येथील सुरेश विलास निकम हे बुधवारी रात्री सावली विहीर गावात चुलत भावासह सासरच्या घरी पोहोचले. त्याने घराचा दरवाजा उघडताच घरात उपस्थित असलेल्या सासरच्या मंडळींवर धारदार चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, जावई सुरेश याने पत्नी वर्षा, मेव्हणा रोहित आणि आजी यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. या घटनेत आरोपीची सासू, सासरे आणि मेहुणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्नी,वृद्ध आजी सासू यांचाही मृत्यू झाला.
कौटुंबिक वादातून त्याने सासरच्या मंडळींवर चाकूने हल्लाकेल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी वृद्ध आजीलाही सोडले नाही आणि तिचीही हत्या केली. वर्षा सुरेश निकम (आरोपीची पत्नी, वय 24), रोहित चांगदेव गायकवाड (मेहुणे, वय 25), हीराबाई द्रौपदा गायकवाड (आजी, वय 70) अशी तीन मृतांची नावे आहेत. तसेच चांगदेव द्रौपद गायकवाड (सासरे, वय 55), संगीता चांगदेव गायकवाड (सासू, वय 45), योगिता महेंद्र जाधव (मेहुणी, वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणी सुरेश विलास निकम आणि त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम या दोघांना पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.