राज्यातील राजकारणातील मोठी बातमी समोर आलीय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने या दोन्ही निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुरंदर विधानसभा निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
पुरंदर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे विधानसभेसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही स्वबळावर लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीला सुरुंग लागल्याचं चिन्हं दिसत आहे
हे पण वाचा..
हा काय वेडेपणा! उड्डाणपुलावर उभा राहून करू लागला नोटांचा वर्षाव, Video झाला व्हायरल
मुलाने केला घोळ अन्.. भीमा नदीत एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या
जळगावातील बेरोजगारांसाठी खुशखबर.. विविध पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. तो राष्ट्रवादीसाठी फायदेशीर ठरेल. राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे येत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं पुरंदर तालुका राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं.