जळगाव । पाण्याच्या डोहात पोहोण्याचा मोह दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतला आहे. शिरसोली गावाजवळील धारागिर शिवारातील पाण्याच्या डोहात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी घडली. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि सुर्यवंशी शिवाजी पाटील (वय-१५) दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली असे मृत मुलांचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे घटना?
शिरसोली गावाजवळ असलेल्या धारागिर शिवारात असलेल्या पाण्याच्या तलावात पोहण्यासाठी जय जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री आणि सुर्यवंशी शिवाजी पाटील हे तिन्ही आज गुरूवारी दुपारी गेले होते. यात पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि सुर्यवंशी पाटील यांना पाण्याचा अंदाज न असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर जय सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरीकांना तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले.
हे पण वाचा :
..म्हणून महिलेने ब्युटी पार्लरवाल्याला चप्पलने धुतलं ; पहा ‘हा’ व्हिडीओ
तुम्हीही बिअरचे शौकीन आहात? मग ही बातमी नक्कीच वाचा, पहा काय घडलं जळगावात
गुडन्यूज : सणासुदीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, इतक्या रुपयांनी कमी होऊ शकतात दर?
गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघांचे मृतदेह रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.