मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचं संसार उघडल्यावर आला आहे. पण मुख्यमंत्री मात्र दिल्लीत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठीच हा सगळा अट्टाहास सुरु असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, अमित शाह यांचा आमच्यावरही दबाव आहे आणि दबावाला बळी पडून ज्यांना जायचंय ते जात आहेत, असा खळबळजनक दावाही संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील काही खासदारांच्या घरांवर चौकी पहारे लागलेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त अचानक काही खासदारांच्या घरांवर लावण्यात आला आहे. पोलीस बळाचा, केंद्रीय यंत्रणा, पैशांचा वापर केला जातोय. ब्लॅकमेलिंगही होतंय. पण ठिक आहे. जो होगा वो देखा जायेगा. कोणत्याही परिस्थितीशी संघर्ष करायला, सामना करायला, लढा द्यायला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत आले असतील तर त्यांची रुटिन व्हिजिट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे, म्हणून त्यांना दिल्लीत यावं लागतं. मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. कारण शिवसेनेचे मुख्यमंत्री मी पाहिलेयत दोन. एक मनोहर जोशी, दुसरे नारायण राणे. पण त्यांना मी कधी दिल्लीत आल्याचं पाहिलं नाही. त्यांच्या सर्व चर्चा शिवसेनेच्या काळात मुंबईतच होत होत्या.”
हे देखील वाचा :
धक्कादायक : स्कूल बस चालकाचा शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार, असा झाला उलगडा
रावेर तालुक्यातील गारबर्डी धरण क्षेत्रात अडकलेल्या ‘ त्या’ नऊ युवकांची सुखरूप सुटका
उद्धव ठाकरेंना मोठा हादरा: शिवसेनेचे बारा खासदार शिंदे गटात
मुक्ताईनगर नगरपंचायतीवर राज्यातील शिंदे समर्थक पहिला तरुण नगराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब
“लढाई कोणतीही असू द्यात. चिन्हाची, पक्षाची कोणतीही. मी तुम्हाला सांगतो की, कोणत्याही लढाईशी दोन हात करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. मी कालही आपल्याला सांगितलं. ज्या पद्धतीनं छुपे वार सुरु आहेत. जसं महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे भाजपचे नेतेच सांगतात. अखंड महाराष्ट्र तोडायचा, असं आम्ही नाही, तर भाजपचे नेते सांगतात. जर महाराष्ट्राचे तुकडे करायचे असतील तर आधी अखंड शिवसेना फोडा, शिवसेनेचे तुकडे करा. पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागले आहेत. त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो.”, असं संजय राऊत म्हणाले.