जळगाव : शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण अजूनही शिंदे गट आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. अशातच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केलाय, तो पक्ष आम्ही वाचवतोय” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
“आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही. आमचा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विरोध नाही ते आम्हाला आदराचे आहेत” असं म्हटलं आहे.
हे पण वाचा :
ठरलं..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन टप्प्यात होणार, कुणाला मिळणार संधी?
हतनूर धरणाचे 30 दरवाजे 1 मीटरने उघडले
नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ पुन्हा अपघात ; बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
तर दुसरीकडे बंडखोर आमदार संदिपान भूमरे यांनीही शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “संजय राऊत यांच्यामुळे आम्ही आमदार झालो नाही तर आमच्यामुळे ते खासदार झाले. राऊत आता उरलेली शिवसेना देखील संपवणार आहे. यांच्यामुळेच बंड झालं. या सर्व प्रकाराला संजय राऊत हेच जबाबदार आहे” अशी जोरदार टीका संदिपान भूमरे यांनी केली आहे.