जळगाव : राज्यासह जळगावात थंडीचा कहर वाढला आहे. अशात सोमवारी रात्री जळगावात अतिथंडीने निराधार आणि बेघर चार जणांचा बळी गेला आहे. मृत चौघेही निराधार आणि बेघर आहेत. रात्रीच्या सुमारास सुटलेले थंडगार वारे आणि अतिथंडीमुळे गारठून चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित चारही जण जळगाव शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत होते. सोमवारी रात्री ते शहरातील विविध ठिकाणी मृतावस्थेत आढळले आहेत. यामध्ये एकाचा मृतदेह पांडे डेअरी चौकात, दुसऱ्याचा निमखेडी रस्त्यावर तर तिसऱ्याचा रेल्वे स्थानक परिसरात आढळला आहे. तसेच चौथ्या व्यक्तीचा मृतदेह सोमवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला आहे.
संबंधित चारही जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चारही जणांना मृत घोषित केलं आहे. मृत व्यक्ती नेमके कोण? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. संबंधितांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर
जळगाव जिल्ह्यात केळी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती ; जाणून घ्या
सर्वसामान्यांना दिलासा, दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त, या वस्तू महागल्या
पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी
थंडगार जमीन आणि अंगावर पुरेसं पांघरूण नसल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपलेले हे चौघे मरण पावले असावे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु यांचा शवविच्छेदन अहवाल येणं अद्याप बाकी आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.