शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आम्ही कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोतच मात्र परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत, १० वी,१२ वी च्या परीक्षांसदर्भात कुणी तरी माध्यमातून खोटी बातमी पेरली होती, त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु होत्या.दहावी आणि बारावीच्या परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाची परिस्थिती माॅनिटर करत आहोत, असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.
विध्यार्थ्यांसाठी ही सुविधा असणार
जे विद्यार्थी कोरोना काळात परीक्षेला बसू शकणार नाही त्यांच्यासाठी सप्लिमेंट्री परीक्षा घेण्यात येणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे. ठरलेल्या परीक्षांच्या कार्यक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे .
ठरलेल्या वेळीच दहावी बारावीच्या परीक्षा
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या आयोजनासंदर्भात कुणीतरी खोटी बातमी पसरवली होती. विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. परीक्षा ज्या तारखेला आहेत त्याच तारखेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत