मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागात निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारने राज्यातील ग्रामीण भागात दि.17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुर करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षा गायकवाड यांनी ट्विट केला आहे.

