जळगाव :- सर्व वंचित समूह घटकांना सामावून घेत पक्षाची नवीन संघटनात्मक बांधणी करण्यासाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा बैठकीत घेण्यात आला.
पत्रकार भवनात वंचित बहुजन आघाडीची जळगाव जिल्हा (पश्चिम) विभागाची बैठक प्रदेश युवा आघाडीच्या सदस्या शमिभा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
प्रभारी जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र ब्राह्मणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी भारत ससाणे यांनी जळगाव जिल्ह्यात पक्ष विस्तार व संघटनामक बांधणी करण्यासाठी गाव पातळीवर संपर्क अभियान राबविण्याचा विचार प्रास्ताविक करताना व्यक केला.
शमिभा पाटील यांनी सत्तेच्या दिशेने झेप घ्यायची असेल तर ध्येपूर्तीसाठी सक्रिय राहिले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले. यावेळी प्रा.प्रीतीलाल पवार,जिल्हा महासचिव गमिर शेख, विश्वनाथ मोरे,समाधान गवई यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.
बैठकीस वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा (पश्चिम) च्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुजाता ठाकुर, डिंगबर सोनवणे, फिरोजा शेख, अंजली पाटील, जितेंद्र केदार यांचेसह तालुका पदाधिकारी उपस्थित होते.















