शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं चंद्रकांत पाटील यांना वाटतंय…
मोदी सरकारनं संमत केलेल कृषी विधेयका विरोधात शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन सुरु असून अनेक पक्ष, संघटनांनी या आंदोलनात थेट सहभागी होत पाठिंबा दर्शविला आहे. आज शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंद करण्यात आले होते तरीही अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार झालेला नाही. दरम्यान शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल असं भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वाटतंय… याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट केलं आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की,मोदी सरकारने संमत केलेले कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत. मात्र अडते आणि दलालांना समर्थन करणारी मंडळी या कायद्यांना विरोध करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. शेतकऱ्यांना कायद्यांमध्ये जे बदल हवे असतील, ते केंद्र सरकार नक्कीच करेल, असे मला वाटते.
शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षांना संधी चालून आली आहे. मोदी सरकारनं जे कृषी विधेयक संमत केलं आहे ते कसं शेतकरी हिताचं आहे हे पटवून देण्यात भाजपा आपली ताकद पणाला लावतांना दिसत आहे या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट देखील व्हायरल करण्यात आलेल्या आहे.















