जळगाव, (प्रतिनिधी)- कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, विद्यार्थी भावी कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यशास्त्र विभाग विद्यापीठात असणे आवश्यक आहे परंतु तसे आज पर्यंत झालेले नाही. नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याबाबत कलावंतांनी बऱ्याच वेळा तत्कालीन कुलगुरूंची भेट घेऊन पाठपुरावा केला. अर्ज सुद्धा करण्यात आले त्यावर कुलगुरूंनी निधीचे कारण पुढे करून नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात येऊ शकत नाही, असे सांगून त्याबाबत असमर्थता दाखवली होती.
तरी जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात व पूर्ण खानदेशात विद्यार्थी पदवीधर आहे. त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे.पण विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएट नाट्य विभाग नसल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता येत नाही. पर्यायाने नवीन कलावंत आपल्या विद्यापीठ मध्ये तयार होत नाही. तरी विद्यार्थ्यांची मागणी आहे की,येत्या शैक्षणिक वर्षात कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्यात यावा, व यासाठी ची तरतूद प्रभारी कुलगुरू यानी करून कलावंतांना न्याय द्यावा. अशी मागणी
अँड कुणाल पवार (सचिव जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस.)
गौरव दिनेश लवंगले
(राष्ट्रवादी जळगाव शहर व जिल्हा अध्यक्ष )(सांस्कृतिक विभाग) यांनी केली आहे.















