वरणगावं(अंकुश गायकवाड):-शहरातील विविध भागात गोरगरीब नागरिक बहुसंख्येने राहतात,हातावर काम करून आपले उदरनिर्वाह करत आहेत, अश्या भांडे करू लोकांनां,भाडे वसुली किमान 3 महिने भाडे रक्कम साठी मदतीचा हात म्हणून सहकार्य करावे,अशी विनंती भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाच्या वतीने करण्यात आले आहेत. याबाबतीत शासनाने सुध्दा सांगितले आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती असे की, राज्यात कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सर्व देशात २३ मार्च पासून ३ में पर्यंत लॉक डाऊन असल्याने सर्व बाजारपेठा,व्यावसायिक संस्था,कारखाने, व एकूणच सर्व आर्थिक / व्यावसायिक गतिविधि बंद आहे. याचा सर्व सामान्य जनतेच्या रोजगरावरही परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीचा सर्वसामान्य जनतेला कोविड १९ रोगाच्या समस्येमुळे अत्यंत कठीण अशी आर्थिक अडचणींमुळे तोंड द्यावे लागत आहे.
राज्यात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून वर माणूस आर्थिक अडचणीचे परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घराचे भाडे नियमितरीत्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे ही वस्तुस्थिती आहे.
अशा बिकट आर्थिक परिस्थिती मध्ये भाडे वसुली किमान ३ महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रक्कम न मिळाल्यास किंवा भाडे थकल्यास कोणत्याही भाडेकरूंना घरातून काढून टाकू नये.अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात आले आहे.परंतु शहरातील घर मालक नक्कीच मदत करतील यात तीळ मात्र ही शंका नाही, तरी पण भटक्या विमुक्त बहुजन युवा संघातर्फे विनंती करण्यात येत आहेत.














