वरणगावं(अंकुश गायकवाड):- आज लाॕकडाऊनमुळे वरणगावं व परिसरात असलेली ऑटो रिक्षा सध्या बंद असल्यामुळे चालक-मालक संकटात आहे. कोरोना सारखे संकट अवघ्या जगभर पसरले असताना सगळीकडे कोरोनाचा आहाकार माजला असताना संकट काळात अॕटो रिक्षा वाल्यांच्या मदतीला कोणीही धावून येताना दिसत नाही. बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतलेली रिक्षावाल्याचे हातावरचे पोट असलेल्या या रिक्षा वाल्याची परिस्थिती आज खुपच भयंकर अडचणीत येऊन सापडली आहे. दिवस भर रिक्षा चालवून संपुर्ण कुटुंब चालवणारा हा रिक्षा चालक आज अक्षरशः पोरका होऊन पडला आहे. तरी आपण या भयानक संकटात सापडलेल्या रिक्षा चालक,मालकांच्या मागण्या रिक्षा चालक मालकास किमान ५००० रू. मानधन द्यावे, १ वर्षा करीता गाडी पासिंग करीत लागणारा ईशुरन्स (विमा) माफ करण्यात यावा, बँकेचा २ महिन्याचा ‘कर्ज हप्ता’ माफ करावा, रेशन दुकानात ‘विशेष धान्य’ मिळावे.
आज राज्यात साधारणपणे ७ लाख रिक्षा परवाने असून वरणगावं व परिसरात हाजाराच्या आसपास परवाने आहे. त्यावर रिक्षावाल्यांचे कुटुंब चालत आहे. तरीही आपण याकडे जबाबदारी पुर्वक लक्ष घालून या तीन चाकी ‘अॕटो रिक्षा’ चालक मालकाच्या योग्य मागणीचा विचार करून सहकार्य करावे अशी मागणी करण्यात येत आहे.














