- रोहिणीताई 30 हजाराच्या मताधिक्याने विजयी होतील – दशरथ कांडेलकर
- मुक्ताईनगर – निमखेडी गटात प्रचार दौरा: विकासकार्यासाठी कटिबध्द असल्याची रोहिणीताई खडसे यांची ग्वाही

मुक्ताईनगर – येथील विधानसभा मतदारसंघातून भाजपा सेना महायुतीच्या उमेदवार सौ. रोहिणीताई खडसे -खेवलकर या किमान 30 हजाराहुन अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष दशरथ भाऊ कांडेलकर यांनी व्यक्त केला. सौ.खडसे यांच्या मुक्ताईनगर -निमखेडी जि प गटातील प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, आ एकनाथराव खडसे यांनी सर्व जाती धर्मीयांना सोबत घेऊन तीस वर्षे मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मतदारसंघात अशक्यपप्राय वाटणाऱ्या भव्य पूलांची निर्मिती करून तळहातावर केस उगऊन दाखवील असे म्हणनाऱ्या विरोधकांची तोंडे बंद केली. भाऊंनी मतदारसंघातील सगळी गावे डांबरी रस्त्याने जोडली. गावागावात समाज मंदिरे, बौद्ध विहार, शाळा खोल्या, अंगणवाडी खोल्या देऊन विकासाची गंगा वाहती ठेवली. नाथाभाऊनी विशेषतः कोळी समाजासाठी भरीव कामगिरी केली. राज्यातील सर्व कोळी समाज बांधवाना टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वारंवार शासन दरबारी आक्रमक भूमिका घेतली.
भाऊनी राजकारण करताना खऱ्या अर्थाने समाजकारण करून गोरगरीब जनतेला न्याय दिला. त्यामुळेच त्यांच्या विकास कामांचा लाभ आता भाजपा सेना महायुतीच्या उमेदवार सौ रोहिणीताई यांना होईल. स्वतः रोहिणीताई उच्च शिक्षित असून त्या कर्तव्यदक्ष आहेत. त्यांनी जिल्हा भाजपा सरचिटणीस पद अत्यंत जबाबदारीने सांभाळून राजकीय क्षेत्रात यशस्वीरित्या पदार्पण केले आहे. जिल्हा बँकेला ‘ड’ वर्गातुन ‘अ ‘श्रेणीत आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. सूतगिरणी, साखर कारखान्याच्या माध्यमातून हजाराहुन अधिक बेरोजगाराना रोजगार दिला आहे. त्यामुळेच या निवडणूकित त्यांचा विजय निश्चित असून त्या किमान 30 हजाराहुन अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास श्री कांडेलकर यांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान, मतदारांनी नाथाभाऊचे हात बळकट करण्यासाठी फक्त्त विकास कामांना मतदान करा, कमळ निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे, यापुढे नाथाभाऊ प्रमाणेच मी या मतदारसंघात विकास कामे करीत राहील, अशी ग्वाही सौ रोहिणीताई खडसे यांनी मतदारांना दिली.
यावेळी प्रचार रॅलीत बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील,जि प सदस्य निलेशभाऊ पाटील,जि प सदस्या वैशालीताई तायडे, प.स.सदस्य विकासभाऊ पाटील, चंद्रकांतभाऊ भोलाने, संदीप जावळे, शेषराव पाटील, पुरुषोत्तम पाटील, निलेश खोसे, पुंडलिक वानखेडे, रवींद्र सांगळकर, वासुदेव कोळी, प्रवीण वाघ, संतोष कोळी, नितीन पाटील, रवींद्र कोळी, कवरसिंग पिळोदकर, वसंत तळेले,संजय पाटील, सुभाष तळेले,संजय तळेले,कांशीराम धनगर, बाळू धनगर, गौतम इंगळे, प्रकाश इंगळे, सागर कोळी, वासुदेव कोळी, कैलास कोळी, सुरेश कोळी, मुन्ना बोडे, बाळा भाऊ सोनवणे, पुंडलिक वालखेड,महेंद्र गरुड, सुरेश कोळी, बाळू इंगळे, ज्ञानेश्वर वालखेडे, गजानन दुट्टे, विशाल झालटे,गजानन पाटील ,रतीराम पाटील, रमेश कोळी, मुरलीधर पाटील शालिग्राम पाटील जयराम पाटील, गजानन इंगळे, रसालभाऊ चव्हाण, राजुभाऊ चव्हाण,राजू राठोड, बाळू चव्हाण, ज्ञानेश्वर इंगळे, सुनिल झांबरे, पुरुषोत्तम पाटील, संजय कांडेलकर, संजय पाटील, जितू कोळी, गौतम इंगळे, विकास बनिये, शांताराम इंगळे, हिरालाल कांडेलकर, धर्मेंद्र चोपडे, शांताराम पाटील, रंगलाल रायपुरे,हिरालाल तायडे, विलास भंगाळे, मदन पटेल, गोविंदलाल चौधरी, पुंडलिक पाटील, बाळासाहेब भोई, बाळू बेलदार, रमेश वानखेडे, भागवत वानखेडे यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















