पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला असून संपूर्ण राज्यात पावसानं हाहाकार निर्माण केला असतांना पुन्हा राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी व वीज पडून शंभरच्या वर लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच्या दृष्टीने IMD ने आवाहन केले आहे.
IMD ने ट्विट करून नागरिकांना आवाहन केलं आहे की,विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते.त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पुढच्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह???????? जोरदार पावसाची शक्यता.
विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो.शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते.
IMD ने दिलेले इशारे पहा pic.twitter.com/IwZkHyzTGR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 3, 2021









