चुकीच्या कर पद्धतीमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे -मुख्यमंत्री
मुंबई – महाराष्ट्राच्या हक्काचे 15 हजार 558.05 कोटी रुपये परत करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी केंद्र सरकारकडे थकित असलेल्या महाराष्ट्राच्या पैशांचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच, चुकीच्या कर पद्धतीमुळे राज्याचे मोठे नुकसान होत आहे असेही ठाकरेंनी ठणकावले आहे. तत्पूर्वी राज्यांना केंद्राकडून जीएसटीचे वितरण योग्यरित्या होत नाही असा आरोप करताना शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता.














