रावेर /ता.प्रतिनिधी:-दि.21( विनोद कोळी) – पुनखेडा परीसरात पातोंडी,भोर टेन्शन, बोरखेडा,बोहर्डे,नांदूरखेडा येथे मोबाईल नेटवर्क,रेंज मिळत नसल्याने विद्यार्थी तसेच काही मुलं नोकरीं निमित्त पुणे, मुंबई येथे कंपनीत असून कोरोना मुळे घरी आलेले आहेत. त्यात काही कंपनीचे काम हेऑनलाईन होम वोर्किंग करत आहेत. त्यात रेंज व नेटवर्क चालत नसल्याने त्यांना नाईलाजाने ऑनलाईन काम पूर्ण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आर्थिक भुर्दंड सोसून रूम घेऊन राहावे लागतं आहे.तसेच स्थानिक जिओ कार्ड धारक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्यात शेतकरी,व्यापारी यांना केळी कापणी, वाहतूकीसह अन्य कारणांमुळे संपर्काअभावी ताळमेळ बसत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मोबाईल नेटवर्क रेंज मिळत नसल्याने नुकसानीसह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मात्र पुनखेडा गावातील मोबाईल टॉवर्स शोपिस ठरले असून मोबाईल ला नेटवर्कर व रेंज मिळत नसल्याची संबंधित मोबाईल कंपनीच्या अधिकारी सह विभागाकडे वारंवार तोंडी तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तरी दुरसंचार विभागाचे वरिष्ठ अधिकारीसह संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देवून जनसामान्य जनतेसह शेतकरी व्यापारी यांना नाहक होणार्या त्रासातून मुक्त करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांसह गावकऱ्यांकडून होत आहे.









