कोरची (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील जांभळी गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी कोरची पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!
धक्कादायक बातमी : इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ…
महत्वाची बातमी : तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला
ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जांभळी येथील २५ वर्षीय अजय टिल्लू कल्लो (Ajay Kallo) याने गावाशेजारी राहणाऱ्या १७ वर्षे ६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्याने मुलीला भेटून “तू मला आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करणार आहे,” असे सांगत तिचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. पुढे लग्नाचे आश्वासन देत त्याने वारंवार तिच्यासोबत संबंध ठेवले.
या प्रकारानंतर पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दिली.
तक्रारीच्या आधारे कोरची पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ६४(२)(आय) तसेच पोक्सो कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अजय टिल्लू कल्लो याला ११ मार्च २०२६ रोजी रात्री ८ वाजता अटक केली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांमुळे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून समाजातील विविध स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.










