जळगाव,(प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान एका वाहनात आढळलेल्या सोने, चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री व संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार, २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलोच आहे, अशी माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जहाँ विश्वास ही परंपरा है….
गेल्या ५० वर्षांपासून रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची वाटचाल सुरु असून जहाँ विश्वास ही परंपरा है….या ब्रीदवाक्याच्या अनुषंगानेचं आमची संस्था काम करत आहे. आमच्या ग्राहकांमध्ये गैरसमज होऊन शंका निर्माण होऊ नये म्हणून आज याबाबत खुलासा करत असल्याचेही बाफना म्हणाले.
यासंदर्भात शनिवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बाफना यांनी सांगितले की, त्यांच्यासह शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने.चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीमार्फत केले जाते. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाक्याजवळ प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले. त्यावेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली. मात्र, कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते. त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात येत तब्ब्ल २२ तास चौकशी केली यावेळी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांना व्यवहाराचे संपूर्ण कागदपत्र व डिटेल्स देण्यात आले त्यानंतर खात्री पटल्यानंतर पोलीस विभागाने सदर वाहन सोडले व त्यानंतर आमच्या वस्तू देखील सदर कंपनीने आम्हाला सुपूर्द केले असल्याचं बाफना यांनी सांगितलं.