जळगाव,(प्रतिनिधी)- चुकीच्या पद्धतीने केलेल्या बदल्यांबद्दल राज्यात चर्चा होती दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार ज्या बदल्या झालेल्या नाहीत त्या रद्द करा आणि निर्देशांनुसार नव्याने बदल्या करा, असा आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पोलिस महासंचालक कार्यालयाला दिल्याचे वृत्त होते त्यातच बदलीस पात्र असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पारित केले आहेत.
ज्या पोलिस अधिकाऱ्याचा एकाच जागेवरील कार्यकाळ तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक झालेला असेल त्याची अन्य जिल्ह्यात बदली करा, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिलेले असतानाही बऱ्याच अधिकाऱ्यांच्या त्याच जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली होती. सगळ्या जिल्ह्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आयोगाच्या निर्देशांनुसार झालेल्या आहेत की नाही याची खातरजमा करा आणि निर्देश डावलून केलेल्या बदल्या रद्द करा व नव्याने बदल्या करा, असे आयोगाने बजावले होते.अखेर शुक्रवारी नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पारित केले आहेत यात जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा समावेश आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढलेल्या आदेशानुसार
1)ज्योती चंद्रकांत गडकरी अहमदनगरहून नाशिक ग्रामीण
2)विजय मारुती करे अहमदनगरहून नाशिक ग्रामीण
3)राजेंद्र दामोदर कुटे नाशिक ग्रामीणहून जळगांव
4)रविंद्र गुणवंतराव मगर नाशिक ग्रामीणहून अहमदनगर
5)जयपाल माणिकराव हिरे जळगांवहून धुळे
6)ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव जळगांवहून नाशिक ग्रामीण
7)दिपक किसनराव बुधवंत नंदुरबारहून जळगांव,
8)भरत दत्तात्रय जाधव नंदुरबारहून अहमदनगर
9)अशोक कचरु पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव
10)बापुसाहेब शांताराम महाजन नाशिक ग्रामीणहून नंदुरबार
11)शाम काळु निकम नाशिक ग्रामीणहून नंदुरबार
12)पांडुरंग विठ्ठल पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव
13)शिल्पा गोपीचंद पाटील जळगांवहून नाशिक ग्रामीण
14)अजय तानाजी वसावे नंदुरबारहून नाशिक ग्रामीण
अशा बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षकांसह नाशिक परिक्षेत्रातील १३ सहाय्यक निरीक्षक तर ३२ पोलीस उपनिरीक्षककांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.















