जळगाव,(प्रतिनिधी)- पावसाळ्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये असमाधानकारक पडलेल्या पावसाने कमबॅक करत राज्यात जोरधारा बरसल्या आहेत.मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या दोन दिवसांंपासून राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार, तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पडत आहे.जळगाव जिल्ह्यात सुद्धा शनिवारच्या रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
२५ सप्टेंबर, सोमवार पर्यंत बहुतांश जिल्ह्यांत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. शुक्रवारी दि.२१ कोकण, घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. २५ सप्टेंबरपर्यंत मान्सून राज्यात सक्रिय राहणार असून अधिक पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांत यलो अलर्ट
जळगाव,पालघर,यवतमाळ ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहामदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम,