नवी दिल्ली । राजस्थानमधील अलवरमधून पळून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने नसरुल्लासोबत लग्न केले आहे. अंजूने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिचे नवीन इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. दीर अप्परच्या जिल्हा न्यायालयात अंजू आणि नसरुल्ला यांचा विवाह झाला होता.
लग्नानंतर अंजू म्हणाली की मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा इथे यावे. अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला होता आणि ती अलवरच्या भिवडी औद्योगिक परिसरात राहत होती. तिला दोन मुले आहेत. नसरुल्लाह आणि अंजू यांची 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. आदल्या दिवशी नसरुल्लाहने अंजूशी प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि सांगितले की लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नाही आणि अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यानंतर घरी परतेल.
A pretty girl #Anju from #india in #pakistan…Says she is in love with #KhyberPukhtunkhwa and its culture… she's going back on 20th August…. pic.twitter.com/sx6JFqTmkB
— Sumaira Khan (@sumrkhan1) July 25, 2023
रात्री लग्नाची चर्चा झाली नाही अन् सकाळी लग्न
दोघांचे लग्न झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. अंजू पाकिस्तानातील खैबर पटूनवा प्रांतातील अप्पर दीर या आदिवासी जिल्ह्यात नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली होती. अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. अंजूचा पती अरविंद भिवडी येथे राहतो. गुरुवारी पत्नी जयपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचे अरविंद यांनी सांगितले. मात्र नंतर ती पाकिस्तानात पोहोचल्याचे कुटुंबीयांना समजले.
सीमा हैदर प्रमाणेच आपल्या पतीला सोडून अलवरची अंजू आपल्या ऑनलाइन प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोहोचली, भारतात फोनवर तिचा पती अरविंदशी बोलली. जयपूरला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या अंजूने अरविंदशी फोनवर बोलताना पाकिस्तानला जाण्याचे कारण आणि पुढील योजना सांगितल्या. अरविंदने सांगितले की, 2007 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि तेव्हापासून ते आणि अंजू एकत्र राहत होते. दोघेही भिवडीतील खासगी कंपनीत कामाला असून त्यांना १५ वर्षांची मुलगी व ६ वर्षांचा मुलगा आहे.