जालना । महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील तळणी- मंठा भागात ही घटना घडली असून यात मूल होत नाही या रागातून चक्क पत्नीलाच जिवंत जाळले. सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.
नेमकी घटना काय?
24 जून रोजी कारमध्ये आग लागून पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र आता या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे. या कारला आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती. मूल होत नसल्याचा राग डोक्यात असल्याने पतीनंच हे भयंकर कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा..
खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये मेगाभरती जाहीर
राज्य सरकारची शिधापत्रिकाधारकांना भेट! मिळणार 5 लाखांचा लाभ, जाणून घ्या कसं
जळगावसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा अलर्ट जारी
उर्फी जावेद आता नवीन पराक्रम! VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल
सविता अमोल सोळंखे असं मयत झालेल्या महिलेचं नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती. मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं. अमोल त्या कारणावरून सविताला मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायचा. वारंवार अमोल सविला घटस्फोट दे अशी मागणी करत होता. मात्र त्याला सविता नकार देत होती.
याचाच राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी पाच दिवसांत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.