मुंबई : नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे. ती म्हणजे शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अवघ्या पाच महिन्यात ४ हजार ७०० कोटी रुपयांचे वाटप होणार आहे. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
शिंदे सरकारने 29 जुलै रोजी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा निर्णय घेतला होता. 29 ऑगस्ट रोजी कर्जमुक्ती योजनेसाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची घोषणा केली होती. 16 सप्टेंबर रोजी 2 हजार 350 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला
18 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या हप्त्यापोटी 650 कोटी मंजूर करण्यात आला. तर 17 जानेवारीला तिसऱ्या हप्त्यापोटी 700 कोटी मंजूर करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी शिंदे सरकारकडून शिल्लक एक हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शिंदे सरकारच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.