नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे कोणत्या ना कोणत्या बाबीमुळे चर्चेत राहिले. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर राहुल गांधी चर्चेत आले आहे
राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या दौऱ्यादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Curlytales ला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नावरून प्रश्न विचारला. त्यावेळी राहुल गांधी यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.राहुल गांधी म्हणाले, ‘सध्या लग्नाचं प्लॅनिग करत आहे. लग्नासाठी चांगली मुलगी मिळाली तर लग्न करेन’. लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘मला बायको म्हणून प्रेमळ आणि हुशार मुलगी हवी आहे’.
राहुल गांधी यांनी या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावरील विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या घरचे लग्नाच्या विरोधात नाहीये. माझ्या आई-वडिलांचा विवाह खूप भारी झाला. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या बाबतीत माझे विचार खूप उच्च आहेत. मी देखील अशाच मुलीच्या शोधात आहे’.
हे सुद्धा वाचा..
महाराष्ट्र हादरला ! 20 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार
मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार ; फायनल निर्णय पंतप्रधान घेणार
ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले
राहुल गांधींना जेवणात कोणता पदार्थ आवडतो?
राहुल गांधी यांना जेवणात कोणता पदार्थ आवडतो,यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘मी सर्व पदार्थ खातो. पण मला जॅकफ्रुट आणि वाटाणे आवडत नाही’. त्याचवेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान आवडीचे पदार्थ खाण्याला सवड मिळत नाही. त्यामुळे जे मिळालं, ते खाऊन घेतो. तेलंगणात तर खूप जास्त तिखट खातात. त्यावेळी फार अवघड परिस्थिती झाली होती’.
दरम्यान, राहुल गांधी यांनी पुढे सांगितले, ‘माझा जन्म काश्मिरी पंडित कुटुंबात जन्म झाला. त्यानंतर ते उत्तर प्रदेशात स्थायिक झाले. वडिलांचे वडिल हे पारसी होते. घरात भारतीय पद्धतीचं जेवण तयार केलं जातं. दुपारच्या जेवणासाठी देशी खाद्यपदार्थ आणि रात्री कॉन्टिनेंटल फूड तयार केले जाते’.
तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आइसक्रीम खाण्यास पसंत आहे. तसेच तंदुरी खाण्यास राहुल गांधी यांना आवडते. याचबरोबर चिकन टिक्का, मटण, कबाब, अंड्याची पोळी पसंत आहे.