मुंबई : गेल्या सव्वा महिन्यापासून रखडलेला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसापूर्वीच पार पडला. यावेळी शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दोन दिवस झाले तरी अद्यापही खातेवाटप झालेले नाहीय. अशातच आज रात्री किंवा शुक्रवारी खातेवाटपही होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता खातेवाटपाचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे खातेवाटप कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील वाईला जाणार आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभर सुरु असलेल्या खातेवाटपाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून आता कोणते खाते कुणाकडे हे एवढ्यातच स्पष्ट होणार नाही. मात्र, समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेल्या यांद्यामध्ये काही तथ्य नसल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार की नंतर हे पहावे लागणार आहे.
हे पण वाचा :
सोन्याने सणासुदीत दिली गुडन्यूज ; आज इतक्या रुपयांनी झाले स्वस्त
लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल
रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा
अन् चर्चांना लागला ‘ब्रेक’
आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यावरुन तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर विरोधकांकडून होत असलेले आरोप पाहता शिंदे सरकारने पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार तर केला पण खातेवाटप अद्यापही बाकी आहे. त्यामुळे विस्तारानंतर दोन दिवसांमध्ये खातेवाटप आणि पालंकमंत्री पदही दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने घोषणा करण्यापूर्वीच माध्यमांनी हे सर्व केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर जे सध्या सोशल मिडियावर सुरु आहे तशा स्वरुपाचे खाते वाटप नसणार असेही ते म्हणाले आहेत.