रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. चंदा चौहान असं आत्महत्या केलेल्या तरुण विवाहितेचं नाव असल्याचं समोर आलंय. दरम्यान, मृत महिला चंदा हिने दर्दभरी अत्याचाराची कहाणी चक्क लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली होती. ज्या घरात विवाहीत तरुणीने आत्महत्या त्या घराच्या चारही भिंतीवर आपल्या मृत्यूचं कारण उघड करत या तरुणीने जीव दिलाय. विवाहितेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ माजलीय. सासरचे लोक आणि पती यांना जबाबदार धरत तरुणीने आत्महत्या करत असल्याचा आरोपा केला आहे.
चंदाने 2019 मध्ये सीसीएल कर्मचारी दिलीप चौहानसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवस सगळे सुरळीत चालले होते. त्यानंतर पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद झाला. घरच्यांनी दोघांनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही पटत नव्हते.
ही घटना रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या खलारी पोलिस स्टेशन अंतर्गत डकरा गावात घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. चंदाने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, पती दिलीप तिला नेहमी मारहाण करत असे. तो तिच्यावर अत्याचार करतो, ज्याला कंटाळून ती मृत्यूला कवटाळते.
हे पण वाचा :
रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा
महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त
भादलीच्या तरुणाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपातची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार, चंदाने तिच्या दोन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच्या लोकांनी दरवाजा तोडून तिची दोन्ही मुले वाचवली. जेव्हा लोक घरात गेले तेव्हा भिंतीवर लिहिलेली चिठ्ठी वाचून त्यांना आश्चर्य वाटले.
भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस मयताचा पती आणि सासरच्या मंडळींची चौकशी करत आहेत. त्याच बरोबर पोलीस खून आणि आत्महत्या या दोन्ही कोनातून तपास करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.