मुंबई : राज्यात महाविकास आघाडी पायउतार झाल्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केलं असून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र अद्यापही या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नसून याची उत्सुकता लागून आहे. कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? याची उत्सुकता अजूनही कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षातील काही ज्येष्ठ नेते मंत्रीपदाची शपथ घेतील. तर उर्वरित विस्तार हा राष्ट्रपती निवडणुकीच्या नंतर केला जाईल.
नव्या सरकारमध्ये गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपाकडे तर नगरविकास आणि महसूल ही खाती शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. अर्थ खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच कृषी तर उदय सामंत यांना शिक्षण विभाग देण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दीपक केसरकर यांनाही चांगलं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे.
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार या राज्यमंत्र्यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.
हे पण वाचा :
हतनूर धरणाचे 30 दरवाजे 1 मीटरने उघडले
नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ पुन्हा अपघात ; बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, इंटेलिजन्स ब्युरोकडून 766 जागांसाठी भरती जाहीर!
CCTV VIDEO : धक्कादायक ; आईच्या डोळ्यासमोर क्षणात ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
किती मोठे मंत्रिमंडळ असेल ?91व्या घटनादुरुस्तीमध्ये कलम 72 मध्ये 1A च्या नावाने एक नवीन कलम जोडण्यात आले, ज्यामध्ये मंत्रिमंडळाचा आकार आणि प्रकार स्पष्ट शब्दात स्पष्ट करण्यात आला आहे. तो केंद्रीय मंत्रिमंडळासाठी 72(1A) सुधारणा कायदा आहे तर राज्यांसाठी कलम 164(1) मध्ये स्पष्ट केला आहे. आता याच आधारावर राज्याचे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाची सदस्यसंख्या ठरवायची आहे. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 असल्याने त्यातील 15 टक्के म्हणजे 42. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनते तेव्हा त्यात जास्तीत जास्त 42 जणांनाच मंत्री करता येते. यामध्ये मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. 28 नोव्हेंबर 2019 रोजी ठाकरे सरकारने शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत 31 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्यमंत्री होते.