पाचोरा । चाळीसगाव तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा जितेंद्र दिलीप जाधव हा पत्नी पुजा आणि ६ वर्षाचा मुलगा व खुशी नावाची ४ वर्षाची मुलगीसह वास्तव्याला आहे. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणुन काम करत होता. दरम्यान जितेंद्र व पुजा यांच्यात अधुन मधुन कौटुंबिक वाद होत असल्याने पुजा हिने ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र याचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पुजा ही भाऊ, काका आणि काकुंसोबत माहेरी निघून गेल्या जितेंद्र हा दोघ मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मुळगावी आला होता.
दरम्यान, आज सकाळी ११ वाजता सचखंड एक्सप्रेस धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही मुलांसह उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख, हेड कॉन्स्टेबल मधुसूदन भावसार व प्रविण वाघ यांनी पंचनामा केला. याप्रकरणी रेल्वे पोलीसात अत्महत्येचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे बोरखेडा गावी मोठी शोककळा पसरली आहे.