अमळनेर । सततची नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून कळमसरे येथील विष्णू रामदास चौधरी (वय-६५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, विष्णू चौधरी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह शेतीचे काम करतात. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची विष्णू चौधरी यांनी भेट घेतली. कामानिमित्त मुलगा आणि पत्नी बाहेरगावी गेले होते. त्यांनी त्यांच्या पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी जेवणासाठी घरी आले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांनी पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये गळफास घेतल्याने निदर्शनास आले.
शेतातील सततच्या नापीकी आणि डोक्यावर तीन लाखांचे कर्ज या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांकडून समजते. त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले.
विष्णु चौधरी हे गावात मनमिळावू कष्टकरी असल्याने त्यांनी आपल्या एकुलता एक मुलाला उच्चशिक्षित केले होते. मात्र सदयस्थितीत नोकरी सर्वसामान्य माणसाला सहज नसल्याने त्यांचा शेती व्यवसायावर अवलंबून होते. त्यांच्या पत्नी आणि मुलाला ही घटना समझताच त्यांचा आक्रोश केला. यावेळी गावात शोककळा पसरली होती व गावात चुल पेटल्या नाहीत. याप्रकरणी देवीदास चौधरी यांच्या ख़बरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ नथ्थू चौधरी, मुलगा विकास, सुन नातवंडे व तीन मुली असा परीवार आहे.
हे देखील वाचा :
तुम्ही किडनी विकाराने त्रस्त आहेत का ? ‘ही’ लक्षणं दिसताचं ; तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्या…
SBI ग्राहकांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा, अन्यथा बंद होणार बँकिंग सर्व्हिस
ट्रेनमध्ये या वेळेत TTE तिकीट तपासू शकत नाही? जाणून घ्या काय आहेत नियम
पंतप्रधान मोदींकडून राज्याबाबत भेदभाव होतोय; खडसेंचा आरोप
12 वीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष्य द्या! आज ऑनलाईन पद्धतीने मिळणार हॉलतिकीट!