एरंडोल । शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नितीन शालीग्राम पाटील (वय-२३) रा. वैजनाथ ता. एरंडोल असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, नितीन याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले असून या घटनेने कुटुंबियांना धक्काच बसला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वैजनाथ येथील नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास आहे. नितीन हा घरी वडीलांना शेतीकामात मदत करीत होता. शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. मात्र त्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नितीनचे काका भगवान पाटील हे त्यांच्या शेतात गेल्यानंतर त्यांना झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले.
दरम्यान, नितीन याच्या आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती आपल्या भावाला दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला मयत घोषीत केले. मयत नितीनच्या पश्चात त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.
हे सुद्धा वाचा :
नोकरीची संधी पुन्हा मिळणार नाही? बँकेत पदवी पाससाठी मोठी पदभरती
भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला उडविले, भीषण अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर
LIC चा सुपरहिट योजना! वयाच्या 40 व्या वर्षी मिळेल 50 हजार रुपयांपर्यंत पेन्शन
रश्मिका मंदान्ना ठरली oops Moment ची शिकार; सोबत जे घडायचं नव्हतं ते घडलं? फोटो व्हायरल