पुणे: राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असून आज सकाळी जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा 7.5 अंशावर पोहोचला होता. येत्या काही दिवसांत उत्तर भारतात किमान तापमानाचा काही अंशी घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होत असली तरी या महिन्या किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा कमीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एक महिनाभर राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. अशात मागील काही दिवसांपासून राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका वाढतच चालला आहे.
हे देखील वाचा :
माजी आयपीएसच्या घरावर आयकर छापा, बेहिशेबी 3 कोटी रुपये जप्त
सर्वसामान्यांना दिलासा, दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त, या वस्तू महागल्या
कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या
पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी
यासोबतच राज्यात बहुतांशी जिल्ह्याचं तापमान 2 ते 3 अंशानी घटलं आहे. आज नाशिक 9.5, पुणे 9.9, मालेगाव 11.4, बारामती 11.4, सोलापूर 12.6, सातारा 13, कोल्हापूर 17, महाबळेश्वर 14.4, अहमदनगर 8.8, उस्मानाबाद 12.1, जेऊर 11, माथेरान 14.8, सांगली 15.3, चिखलठाणा 10.8, नांदेड 12.2, परभणी 14.5, कुलाबा 17.5, सांताक्रूझ 14.8, ठाणे 18, रत्नागिरी 16.5 आणि नागपूर याठिकाणी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.