भुसावळ : जुळ्या मुुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन पती व सासूकडून होत असलेल्या छळास कंटाळून विवाहिनेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. याबाबत शहर पोलिसात पतीसह सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कंडारी येथील सुभाष नगरातील रहिवासी विवाहिता मनीषा गौरव तायडे (26) यांनी 23 डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरुन सासू पुष्पा भीमराव तायडे व पती गौरव भीमराव तायडे यांनी मुलगा हवा होता म्हणून मानसीक व शारीरीक त्रास देऊन मनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केले.
पतीसह सासुविरोधात गुन्हा
सोमवार, 3 रोजी पहाटे विवाहितेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. याबाबत विवाहितेचे वडील सुनील पोपट तायडे (53, महादेव टेकळी कंडारी) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गु.र.नं. 1/22, भा.दं.वि. 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे सासू पुष्पा तायडे व पती गौरव तायडे (सुभाष नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात