जामनेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अपघातांची मालिका काही केल्या खंडित होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातील गारखेडा तेथे आयशर व रीक्षाच्या अपघातात चार ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा आयशर व कारचा अपघात झाला. भरधाव आयशरने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी जामनेर-पाचोरा रस्त्यावरील टाकळी गावानजीक घडली. यात आणखी ३ जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे.
याबाबत असे की, लग्नकार्याच्या निमित्ताने भुसावळ येथील नागरिक पाचोराकडे इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते. याचवेळी टाकळी गावाजवळ आल्यानंतर नागदेवता मंदिरापाशी अज्ञात भरधाव जाणाऱ्या वाहनाने इंडिगो कारला जबर कट मारला. परिणामी, इंडिका चालकाचा ताबा सुटला आणि कार साईड पट्टीवरुन नाल्यात जाऊन कोसळली. यामुळे इंडिगो कार मधील महिला व पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण अत्यवस्थ झाले. तसेच सहा महिन्यांचे बाळ या अपघातातून वाचले आहे. असुन त्यालाही जखमा असल्याने खाजगी हाँस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तर इतर जखमींना नागरिकांनी जामनेरच्या जी. एम. हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले.
पंकज गोविंदा सैंदाणे (वय २५, रा. तुकाराम नगर) व सुजाता प्रवीण हिवरे (वय ३०, रा. त्रिमूर्तीनगर दोघे रा. भुसावळ) असे अपघातातील मृतांचे नावे असून यात हर्षा पंकज सैंदाणे, नेहा राजेश अग्रवाल, प्रतिभा जगदीश सैंदाणे, लहान बाळ स्पंदन पंकज सैंदाणे हे जखमी झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी गरखेडा येथे झालेला अपघात ताजा असतानाच आज हा अपघात झाला आहे.