पुणे : कार्तिकी एकादशीच्या वारीसाठी आळंदीला पायी निघालेल्या वारकरी दिंडीत पिकअप टेम्पो घुसल्यानं मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ६ वारकऱ्यांचा मृत्यू झाला २५ ते ३० वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटे साडेपाच वाजता वडगाव मावळ जवळील साते गावच्या हद्दीत झाला आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त छोट्या ट्रॅक्टरला जोडलेल्या पालखीसह वारकऱ्यांची दिंडी पायीच आळंदीकडे चालली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी खालापूर तालुक्यातील उंबरे गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीला पिकअपने जोराची धडक दिली.
यात जवळपास 30 वारकरी जखमी झाले होते. यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. सहा रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमी वारकऱ्यांना जवळपासच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्यांपैकी ६वारकऱ्यांचा मृत्यू झाला.