अक्कलकुवा : गुरांना पाणी पाजताना तोल गेल्याने तलावात बुडून दोन बालिकांचा मृत्यू झाला. काठीचा राऊतपाडा, ता.अक्कलकुवा येथे ही घटना बुधवारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काठीचा राऊतपाडा, ता.अक्कलकुवा येथील तलावात दोन बालिका गुरांना चारण्यासाठी व पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पाण्यात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. भुमिका गुलाबसिंग वळवी (वय ९) व अंकिता दामज्या राऊत (७, दोन्ही रा.काठीचा राऊतपाडा) अशी मयत बालिकांची नावे आहेत. याबाबत मोलगी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.