जळगाव । चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे तीन बालकांना विषबाधा झाल्याचा प्रकार आज यावल तालुक्यातील चितोडा येथे उघडकीस आला. वरून योगेश इंगळे, कृष्ण किरण पाटील, दुर्गेश चंदू पाटील असे विषबाधा झालेल्या बालकांचे नाव असून यातील दोन जणांवर यावल रुग्णालयात उपचार सुरु असून एकला भुसावळ येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत असे की, चितोडा येथे आज जि.प.शाळेच्या अंगणात खेळत असताना वरून योगेश इंगळे, कृष्ण किरण पाटील, दुर्गेश चंदू पाटील या तिघांनी चंद्रज्योती या फळाच्या बिया फोडून खाल्ल्या. मात्र काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागला. मुलांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. सदर बाब लक्ष्यात येताच नागरिकांनी त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यामधील वरून इंगळे या मुलाला पुढील उपचारासाठी भुसावळ येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, मुलांना उलट्या होत असल्याचे लक्ष्यात घेत त्यांना गावातील सरपंच सलीम तडवी, पोलीस पाटील पंकज वारके, ग्रा.प.सदस्य मनोज पाटीलसह आदींनी तिघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.