भुसावळ : तालुक्यातील खडका येथे शेजाऱ्यांच्या गच्चीवर वाळत टाकलेले तांदूळ जमा करून लाेखंडी जिन्यावरून उतरताना पाय घसरून पडल्याने खडका येथील बारावीच्या विद्यार्थिनीचा दिवाळीला वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला. नेहा सुधाकर काेळी (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे.
खडका येथील सुधाकर काेळी यांची मुलगी नेहा ही गावातील ज्ञानज्याेती विद्या मंदिरात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरूवारी सकाळी ती शेतात लाणी (ज्वारीचे कणसं कापणे) करायला गेली हाेती. तेथील काम आटाेपून ती घरी परतली. यानंतर शेजारी राहात असलेले दिलीप पाटील यांच्या गच्चीवर त्यांचे तांदूळ वाळत टाकलेले हाेते. ते तांदूळ घेऊन ती लाेखंडी जिन्याने खाली उतरत हाेती. नेमके यावेळी पाय घसरून ती जिन्यावरून खाली पडली. हा जीना जमिनीपासून सुमारे २० ते २५ फूट उंच आहे.
त्यावरून जमिनीवर कोसळल्याने नेहाच्या डाेक्याला जबर मार लागला. याच वेळी तिच्या कानातून रक्तस्त्राव झाला. यामुळे नेहाला तत्काळ हाॅस्पिटलमध्ये नेण्याची लगबग झाली. मात्र, वेळेवर रिक्षा उपलब्ध झाली नाही. यामुळे जखमी अवस्थेतच तिला दुचाकीवरून डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे दाखल करून न घेता त्याला जळगावला पाठवण्यात आले. यादरम्यान रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. यानंतर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून सायंकाळी खडका येथे अंत्यसंस्कार झाले.