चाळीसगाव प्रतिनिधी | अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान आणि कर्ज फेडीच्या विंवचनेतून, तांबाळे खुर्द येथील ४६ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. परशुराम सुदाम पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
तांबोळे खुर्द येथील परशुराम सुदाम पाटील यांची िहरापूर शिवारात दाेन एकर शेती आहे. त्यात त्यांनी कपाशी लावली होती. गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे आताेनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता त्यांना सतावत होती. शेवटी त्यांनी दि. १२ राेजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतातच विष प्राशन करून जीवन संपवले. चाळीसगाव ग्रामीण पाेलिस व तांबोळे येथील तलाठ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृत पाटील यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
मदत मिळवून देणार : घटनेची माहिती मिळताच पं.स. सभापती अजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प. सदस्य भाऊसाहेब जाधव यांनी ताबाेंळे येथे धाव घेत मृताच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ताबाेंळे, गणेशपूर, चितेगाव, तळेगाव परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.