झारखंड : कार आणि बस च्या झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. झारखंडमधील रामगड येथे हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र, अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.