एरंडोल : बैलाला धुण्यासाठी गेलेल्या एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील सागर ज्ञानेश्वर माळी वय १५ या मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी घडली आहे.
सोमवारी पोळा असल्याने सर्व ग्रामस्थ बैल धुण्यासाठी धरणावर गेले होते. ग्रामस्थांसोबत सागर माळी हा सुध्दा एकदाच घरचे बैल धुण्यासाठी गेला. बैल धुणे झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. याठिकाणी चिखलात पाय फसल्याने तो बुडाला. प्रकार लक्षात आल्यानंतर याठिकाणच्या इतर ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच खोटेनगरजवळ वाटेतच सागरचा मृत्यू झाला.