जळगांव(प्रतिनिधी)- मागील दिवसात महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन तर्फे जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी व शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव यांना खासगी शाळेच्या मनमानी फीस घेण्याच्या व फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातून काढून टाकल्याचा प्रकार आपल्याला निवेदनातून कळवला होता व त्या पासून विद्यार्थ्यांना व पालकांना यातून दिलासा मिळावा अशी मागणी केली होती. परंतु अद्यापही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
कोविड-१९ च्या या पार्श्वभूमीवर जे आर्थिक संकट आले आहे. त्यात सामान्य माणूस होरळपळून निघाला आहे.अशातच काही खासगीशाळा ह्या मनमानी पध्दतीने आधी ज्या प्रकारे फीस आकारात होते त्याच पद्धतीने आता आकारून त्यांची आर्थिक पिळवणूक करत आहे. लाँकडाऊन मुळे गेल्या अडीच वर्षा पासून सर्वे काम घरूनच चालू आहे. ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे.
त्यात काही शाळा ह्या कोविड-१९ सुरू होण्या आधी जितकी फीस घेतात तेवढीच फी आता ही आकारत आहेत. पालकांनी का म्हणून इतर फीस द्यायची, तसेच फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना काढले जात आहे. अश्या या परिस्थितीत सर्व सामान्य पालक आपल्या पोटाला चिमटा घालून शाळेची इतकी फीस भरत आहे, तरी खासगी शाळांची ही अवाजवी फी कमी करून फक्त ट्युशन फी घ्यावी आणि विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची ही आर्थिक गळचेपी थांबवावी अन्यतः महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन येत्या दोन दिवसात अन्यत्याग आंदोलन(आमरण उपोषण) करेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी अँड.अभिजित जितेंद्र रंधे, दीपक सपकाळे, सचिन यशवंत बिऱ्हाडे, चेतन चौधरी,रोहन युवराज महाजन, संतोष भंगाळे, ललित पाटील,आकाश धनगर उपस्थित होते.