यावल,(प्रतिनिधी दिपक नेवे)- संपादक रीनेइसन्स् स्टेट’ या पुस्तकातुन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणी मातोश्री सोयराबाई साहेब तसेच छत्रपती घराण्याचा अपमान होईल अशा पद्धतीचे देशद्रोही लेखन करणारा गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर ताबडतोब बंदी घालावी,तसेच त्याने समस्त धारकरी, शिवप्रेमी, शिवभक्त सर्व समाजा ची माफी मागावी या मागणी साठी आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यावल तालुका व स्वराज्य निर्माण सेना यावल च्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , लोकसत्ताचे गिरीष कुबेर यांच्या व्दारे लिखित रीनेइसन्स स्टेट या ग्रंथात धर्मवीर छ्त्रपती श्री संभाजी महाराजांच्या बद्दल पृष्ठ क्रमांक७६वर टीका केली आहे . यामध्ये गिरीष कुबेर यांनी आपली अल्पमती पाजळतांना धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराजा विषयी जणु काही इतिहास संशोधक असल्याच्या थाटात जाणीवपुर्वक काही नवीन जावईशोध लावले आहे . यातुन कुबेरांचे इतिहासाचे अर्धवट ज्ञान दृष्टीस पडते आहे . या पुस्तकात गिरीष कुबेर यांनी लिहीले आहे की , शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर जो वारसाचा प्रश्न निर्माण झाला तो सोडविण्यासाठी संभाजीराजांनी रक्तपात केला . त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणी शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले . या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणी पुढे संभाजी महाराजांना त्याची मोठी किमत चुकवावी लागली . यात त्यांनी आणखी एका ठीकाणी ते लिहीतात की संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजा प्रमाणे सहनशीलता नव्हती आणी परराष्ट्रविषयक धोरण ही नव्हते, गिरीष कुबेर हे जे काही लिहीतात त्याला इतिहासिक संदर्भ अजीबात पुरावे नाहीत . त्यामुळे गिरीष कुबेर यांच्या संदर्भहीन लिखाणामुळे महाराष्ट्रातील आम्हासारखा देव , देश धर्मभक्त कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
समाज जातीजातीत तेढ निर्माण व्हावी यासाठी अशा पद्धतीने लिखाण केले गेले आहे की काय असा संशय यावा असेच हे लिखाण आहे .तरी गिरीष कुबेर यांनी लिहीलेल्या रीनेइसन्स स्टेट या पुस्तकावर महाराष्ट्रातच नव्हेतर संपुर्ण देशात बंदी घालावी ज्यायोगे महाराष्ट्राबद्दलचा वधर्मवीर श्रीसंभाजी महाराजांबद्दलचा खोटा इतिहास प्रसारीत होणार नाही.
या पुस्तकावर तात्काळ बंदी न आणत्यास श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या माध्यमातुन तिव्र निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरू असा ईशारा ही निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असुन प्रसंगी या मागणीसाठी तिव्र आंदोलन ही छेडण्याचा ईशारा ही दिला असुन या निवेदनावर श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानचे यावल तालुका राहुल कोळी , मयूर महाजन, हर्षल येवले , अभिषेक चौधरी , चेतन भोईटे, हर्षल ठाकरे यांच्या स्वाक्षरी आहे .