मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता ते आमच्यावरच फुत्कारततय अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार अस म्हणत ठणकावले आहे.
फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. तुमच्यात हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही तुम्ही? पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग तुम्ही दाऊदच्या मुसक्या का आवळत नाही?” असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
हे देखील वाचा :
उन्हाळ्यापूर्वी वाढणार एसी, फ्रीज आणि पंख्यांच्या किमती, जाणून घ्या किती होणार महाग?
मोठी बातमी : राज्यातील 14 जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवले, अनलॉकच्या नव्या गाईडलाईन्स जारी
भरधाव बसची बुलेटला धडक, तीन जिवलग मित्रांचा मृत्यू
पदवीधरांना सुवर्णसंधी.. या बँकेत सुरूय विविध पदांसाठी भरती
केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपूर्वी हे काम पूर्ण करा ! नाहीतर बुडतील 4,500 रुपये, जाणून घ्या
केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर होणाऱ्या कारवाईवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. आज इकडे तिकडे धाड पडत आहे, याला- त्याला अटक करत आहेत. मात्र आपली आपली एकजूटच आपली ताकद आहे असे म्हणत माझे 170 मोहरे फोडून दाखवाच. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्करणार नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजला थेट आव्हान दिलंय.














