जळगाव, (प्रतिनिधी)- काल श्रीनगर येथे लष्कराच्या गस्ती पथकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव, (ता.चाळीसगाव) गावचे जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी 5.30 वाजता नाशिक येथे पोहचले आहे.
लष्कराची गार्ड टीम ऊद्या सकाळी 6 वा. त्यांचे पार्थिव घेऊन नाशिक येथून निघणार असून सकाळी 8. 30 वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे.
त्यानंतर अंदाजे 10 वाजेदरम्यान त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे भुसावळ येथील कर्नल करूण ओहरी यांनी सांगितले आहे.