
मुक्ताईनगर – भाजप शिवसेना रासप रिपाई रयत क्रांती संघटना शिवसंग्राम महायुतीच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार सौ. रोहिणीताई खडसे यांनी रावेर तालुक्यातील येथे सुनोदा, मंगलवाडी, तांदलवाडी,सिंगत, बलवाडी,भामलवाडी,पुरी, गोलवडे, निंबोल येथे प्रचार रॅली काढून मतदारांचे आशिर्वाद घेतले यावेळी प्रत्येक गावात त्यांना मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकनेते आ. एकनाथराव खडसे यांचे माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील रावेर तालुक्यातील 43 गावात मोट्या प्रमाणात विकास साधलेला आहे. रस्ते, समाज मंदिरे इ. विकास कामासह शासन शासनाच्या माध्यमातून विविध लाभाच्या योजना गावागावातील गोर गरीबापर्यंत पोहचवल्या आहेत, याशिवाय केळी पिकाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त कसे पाडून घेता येईल यासाठीच पीक विम्याच्या निकषात काही नियमात बदल शासन दरबारी करून घेतले आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाने राजकारणाचे बाळकडू घेत सौ रोहिणीताईनी सुद्धा सहकार क्षेत्रासह शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अल्पावधीत भारदस्त कामगिरीतुन आपला ठसा जनमानसांवर उमटवला आहे. निश्चितच त्या विकासाच्या व्हिजन असलेल्या युवा नेतृत्व आहेत, त्यामुळेच या निवडणूकित नाथाभाऊचे हात बळकट करण्यासाठी दि 21रोजी कमळ निशाणी समोरील बटन क्लिक करून रोहिणीताईंनाच मतदान करावे.
त्यानंतर रोहिणी खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊनी ज्या प्रमाणे विकास कामे केली, तोच विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील त्यात कुठेही खंड पडू देणार नाही. परिसरातील समस्या सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे मात्र त्यासाठी आपले आशिर्वाद माझ्या पाठीशी असणे गरजेचे आहे. आपण दिलेल्या आशिर्वादाच्या जोरावर मला या भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळेल.
यावेळी संवाद साधताना नंदूभाऊ महाजन यांनी सांगितले की, परिसराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणार्या खडसे कुटुंबाची ही कन्या आहे. आजवर नाथाभाऊंच्या माध्यमातून गोरगरीब जेष्ठ नागरिक, विधवा , परित्यक्ता महिलांना राज्य व केंद्र शासनाने मानधनात सहाशे वरून एक हजार केले. गवंडी काम करणार्यांना मोठा लाभ दिला आहे.तसेच स्व.गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेचा लाभ बहुसंख्य शेतकरी कुटुंबाना होत आहे. शेतकरी सन्मान योजनेतुन प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजाराचा लाभ दिला जात आहे.. अशा कित्ती तरी योजना सुरु आहेत. याशिवाय उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक घरात गॅस कनेकशन देऊन गोरगरीब महिलांचा सन्मान केला. घराघरात वीज मिटर दिल्याचे सांगून गावागावात रस्ते, प्रत्येक गावात बौद्ध विहार, मुस्लिम वस्ती असल्यास शादीखाने उभारले आहेत. खडसे कुटुंबाने निःस्वार्थपणे केलेल्या सेवेची पावती म्हणून येत्या 21 ऑक्टोबरला भाजपाच्या कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून रोहिणीताईंना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रचार रॅलीमध्ये रोहिणीताईसमवेत बाजार समिती संचालक श्रीकांतभाऊ महाजन,भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, म सा का उपाध्यक्ष भागवत पाटील,प स सभापती माधुरी ताई नेमाडे,जि प सदस्य कैलासभाऊ सरोदे, रंजना ताई पाटील, नंदाताई पाटील,प स सदस्य जितूभाऊ पाटील,कविताताई कोळी, वंदना ताई उन्हाळे, नेहाताई गाजरे,महेश भाऊ चौधरी,हरलाल भाऊ कोळी,दुर्गादास भाऊ पाटील,संतोष वाघ,पवन चौधरी, दिलीप सपकाळे, रेखाताई बोंडे, हितेंद्रभाऊ पाटील, शुभम पाटील,जेष्ठ कार्यकर्ते मधुकरजी पाटील , विनायकराव पाटील, संजय भाऊ भिल, मनोहर तायडे, अनिल चौधरी, मधुकर पाटील, पवन पाटील, विनोद पाटील, प्रतिक पाटील, नारायणराव पाटील, सुमितभाऊ चौधरी,अरूणजी पाटील, उदयभानजी तायडे, किरण चौधरी, नितीन महाजन, सोपान कोळी, सदानंद उन्हाळे, जितेंद्र महाजन, प्रमोद चौधरी, रामकृष्ण सपकाळे, विजय चौधरी, तुकाराम कोळी,शामराव पाटील, विशाल पाटील, विनायकराव पाटील, संजय भाऊ भिल, मनोहर तायडे, अनिल चौधरी, मधुकर पाटील, पवन पाटील, विनोद पाटील, प्रतिक पाटील,विनायक पाटील, संजय भिल, मनोहर तायडे, ईश्वर पाटील, विनोद पाटील, पवन पाटील, उत्तम पाटील, अमृत तायडे, चंद्रकांत कोळी, रातीरामकोळी, संदीप पाटील, नितीन पाटील आदीसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.















