- वरणगावं शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी त्वरीत माफ करा
- भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाचे,राज्य अध्यक्ष-अंकुश गायकवाड यांची मागणी
वरणगावं,(प्रतिनिधी):-सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी पूर्णताः विस्कटली आहे त्यामुळे सामान्य नागरीकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परीस्थिती ओढवल्याने वरणगावं नगरपरीषदेने मार्च ते जून या चार महिन्यांची घरपट्टी व पाणीपट्टी कर पूर्णतः माफ करावा, अशी मागणी भटक्या विमुक्त बहुजन युवा संघ राज्य अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासह पालिकेच्या मुख्याधिकारी
यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहेत.
सध्या कोरोनामुळे जगासमोर एक मोठे संकट उभा राहिले आहे. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य लोकांना अधिक बसला आहे. गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे रोजगार, उद्योगधंदे, दळणवाहतूक पूर्णपणे बंद आहे त्यामुळे लोकांच्या हाताला कामधंदा नाही म्हणून परीस्थिती आणखीणच बीकट झाली आहे. एकंदरीत या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेत, शहर नागरीकांची चार महिन्यांची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करणे आवश्यक आहे. अशी मागणी भटक्या विमुक्त बहुजन युवा संघातर्फे राज्य अध्यक्ष अंकुश गायकवाड, जळगांव जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ.श्रद्धा दिलीप गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अरुण धनगर, बंडू कपाटे,जितेंद्र भोई,संपत पवार,सुनील वंजारी,संतोष धनगर,नथु पवार,मारोती शिवलकर,राजू बैरागी,सचिन पालिमंकर,किरण भुसांडे,रवी गायकवाड,वाल्मिक जाधव,विनोद गायकवाड, दीपक जाधव,सचिन जाधव,तुषार जाधव,रोहन भूसांडे,अविनाश जाधव,आयुष गायकवाड, मनोज जाधव आदी पदाधिकारी यांनी केली आहे.
सर्वसामान्यांना दिलासा देण्याची अपेक्षा
कोरोनामुळे सामान्यवर्ग सैरभैर झाला आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी फार कष्ट करावे लागणार आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेला कामगार, मजूरवर्ग, सामान्य नागरीक हा भार सहन करू शकणार नाही म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्व सामान्य नागरीकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांच्या वतीने सुद्धा होत आहे.














