नंदुरबार- विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. पण, तत्पूर्वीच नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर 21 ला मतदान होणार आहे, तर 24 ला निकाल लागणार आहे. या पार्शभूमिवर पक एक-एक करत आपले उमेदवार घोषित करत आहेत. पण, यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लागलेली गळती थांबायचे नावच घेत नाहीये.
नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी आज शहादा येथे कार्यकर्ता मेळावा घेत तिकीट न मिळाल्यास ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्यात जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजेंद्र गावित यांनी शहादा-तळोदा मतदार संघातून राष्ट्रवादी कडून निवडणुक लढवली होती. मात्र या ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता.
2014 ला काँग्रेसचे माजी मंत्री पदमाकर वळवी यांना 719 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हा मतदारसंघ वाटाघाटीत काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थीती नवापूर बाबतीत असल्याने कॉग्रेसला याठिकाणी शरद गावितांची उमेदवारी अटळ मानल्या जात असुन अस झाल्यास जिल्ह्यातील चारही सीट कॉग्रेसला जातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीला पूर्ण भगदाड पडुन नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाचे अस्तित्व संपेल.














