मुंबई, (प्रतिनिधी)- राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असून रुग्ण संखेचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना आहे याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून स्पष्ट करत मोठं विधान केलं असून लॉकडाऊन होणार नसून निर्बंध मात्र कडक असतील असं स्पष्ट केलं आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा उद्रेक होत असून बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांचा संसर्गाला ‘ब्रेक’ लागत नाही त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय अशी भीती नागरिकांना आहे.
राज्यात लॉकडाऊ लागणार का याबाबत आरोग्यमंत्री यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे.नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी.वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील.राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे असं म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागणार नाही मात्र कठोर निर्बंध असतील हे निश्चित.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना केले.
आरोग्यमंत्री श्री.टोपे म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही.
संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनी देखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.















